जळगाव जिल्हाबातम्यामहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर : रब्बी पिकांना किती फायदा? वाचा बातमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे, या थंडीचा जोर जळगाव जिल्ह्यात देखील अनुभवला जात आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यात तापमान खूप खाली घसरले असून यामुळे नागरिकांना हाड गोठवण्यासारखी थंडी जाणवत आहे. सोबत थंडीच्या कडाक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ देखील वाढू लागले आहे.

थंडीचे कारण आणि प्रभाव
हवामान विभागानुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्याने उत्तरेकडून थंड वारे महाराष्ट्रात येत आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्यात बुधवारी तापमान ८.४ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरले होते. दरम्यान आगामी दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून यानंतर थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. किमान तापमान तीन ते चार डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

थंडीचा शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना फायदा
रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या मनात एक आशा असते ती म्हणजे उत्तम हवामान. या वर्षी वाढत्या थंडीचा परिणाम रब्बी पिकांवर सकारात्मक असण्याची शक्यता आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात थंडी वाढल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडी वाढल्याने पिकांना कमी पाण्यात चांगले येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचा असा अंदाज आहे की वाढलेली थंडी पिकांच्या वाढीसाठी लाभदायक ठरेल. स्वच्छ निरभ्र आकाश आणि थंड कोरडी हवा पिकांना अत्यंत पोषक असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते.सध्या थंडीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुखावत आहेत कारण त्यांच्या गव्ह, ज्वारी, हरभरा आणि अन्य रब्बी पिकांना योग्य हवामान मिळत आहे.

“थंडीमुळे आमच्या रब्बी पिकांची वाढ चांगली होत आहे. गव्ह आणि हरभरा या पिकांना थंड हवामान खूप अनुकूल असते, त्यामुळे या वर्षी उत्पादन चांगले होण्याची आशा आहे,” असे जळगाव जिल्ह्यातील एक शेतकरी म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि हवामानाचा फायदा घेऊन उत्तम उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button