‘अभय शास्ती’ योजनेला जळगावकरांचा प्रतिसाद; पहिल्याच दिवशी मनपाच्या तिजोरीत ‘इतक्या’ लाखांचा भरणा

मार्च 6, 2026 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेच्या थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापौर दीपमाला काळे यांनी जाहीर केलेल्या ‘अभय शास्ती’ योजनेला नागरिकांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या योजनेमुळे महापालिकेच्या वसुलीत तब्बल पाच पटींनी वाढ झाली असून पहिल्याच दिवशी सुमारे २६ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

jalgaon manapa

महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून थकबाकी वसुलीसाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विशेष पथके कार्यरत केली होती. मात्र या प्रयत्नांनंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता आणि दररोज केवळ ४ ते ५ लाख रुपयांचीच वसुली होत होती. अनेक थकबाकीदारांनी महापालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, महापौरांनी थकबाकीदारांना दिलासा देत शास्ती (दंड) माफीसह ‘अभय शास्ती’ योजना जाहीर केली आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. योजनेच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात थकबाकी भरून प्रतिसाद दिला. ही योजना ५ ते १९ मार्च या कालावधीत राबवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी २६ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. असे असले तरी मनपासमोर १५ दिवसांत १४० कोटी वसुलीचे आव्हान आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now