⁠ 
बुधवार, मे 8, 2024

HSC Results 2022 : १२ वीचा निकाल जाहीर.. कोकण टॉप तर मुंबई घसरली, मुलींनीच मारली बाजी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे.

हे देखील वाचा : HSC Result 2022 : उत्सुकता शिगेला, थोड्या वेळात जाहीर होणार 12वीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षांचा निकाल बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी देखील मुलीच अव्वल ठरल्या आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या निकालात सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 90.91 टक्के लागला आहे. कोरोना काळ संपल्यानंतर यंदा प्रथमच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामुळे निकाल कसे लागणार याची उत्कंठा अद्यापही विद्यार्थ्यांना लागून आहे. बारावीच्या निकालात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे.  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

विभागनिहाय निकाल 
कोकण – 97.22 टक्के 
पुणे – 93.61 टक्के 
कोल्हापूर – 95.07 टक्के 
मुंबई – 90.91 टक्के
नाशिक – 95.03 टक्के
औरंगाबाद – 94.97 टक्के
अमरावती – 96.34 टक्के 
नागपूर – 96.52 टक्के
लातूर –  95. 25 टक्के