जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । जळगाव शहरातील रहिवासी असलेले दोन तरुण पुण्यात शिक्षण घेत होते. बुधवारी रात्री मित्रांसोबत जेवण करून परतत असताना कात्रजजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघातामुळे जळगावात मोठी शोककळा पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील गांधीनगरात राहणारा रोहित शामसुंदर मणियार वय-२२ व समीर काळे वय-२४ हे दोन्ही तरुण पुण्यात उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले होते. बुधवारी ७ मित्र जेवणासाठी कात्रज परिसरात गेले होते. रात्री जेवण आटोपल्यावर ५ मित्र चारचाकीने घराकडे निघाले तर रोहित आणि समीर दुचाकीने जात होते.
कात्रजजवळ झालेल्या अपघातात दोघांचा पहाटे ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मणियार, काळे परिवारासह जळगावात शोककळा पसरली. रोहित मणियार यांचे कुटुंबीय धान्य मार्केटला व्यापारी आहेत.
हे देखील वाचा :
- 12वी पाससाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी ; तब्बल 3700+ जागांवर महाभरती
- लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार ; संशयित तरुणावर गुन्हा दाखल
- गोदावरी अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनात एम्बेडेड हब सेल आणि एम्बेडेड हब लॅबचे उद्घाटन
- Xiaomi ने Redmi Note 13 सीरीजच्या किमती केल्या कमी, आता ‘इतक्या’त मिळतोय..
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय’चा जल्लोषात समारोप