जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या दोन तीन दिवसापासून चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा येवा वाढत असून धरणांमधून तापी नदीपात्रात पाणी सोडले आहे.

आज सकाळी ९ वाजेल हतनूर धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून १५ हजार ५३९ क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तरी तापी नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांनी व सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे.

नदीच्या काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगांव यांनी केले आहे.








