पिंपळगावात पिकांचे मोठे नुकसान

सप्टेंबर 8, 2021 4:51 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज | तूषार देशमुख | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले पिंपळगाव म्हणजेच गेल्या आठ महिन्यांपूर्वी जम्मू येथे अतिरेकी हल्यामध्ये वीरगती प्राप्त झालेला तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव देशात उंचावणारा शहीद यश देशमुख याच्या पिंपळगाव या गावांमध्ये दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे अक्षरश खूप मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई मातीमोल झाली.

0001 7442880104 20210908 165009 0000 jpg webp

चाळीसगाव तालुक्यात दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्याचा परिणाम पिंपळगाव, रोहिणी तसेच आजूबाजूच्या गावांच्या शेतजमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले व शेतकऱ्यांनी लावलेले कारले, मिरची, कांद्याचे रोप, पपई, टमाटे तसेच इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. पिंपळगावातून चाळीसगाव कडे येणारा रोहिणी या गावाजवळच्या पुलावरून देखील पाणी सुरू होते. त्यामुळे गावाचा आणि शहराचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. पिंपळगावच्या शेतकऱ्यांनी पावसामध्ये आपल्या जमिनींची पाहणी केली. तसेच शक्य तेवढया प्रमाणामध्ये शेतामधून पाण्याला वाट मोकळी करून दिली. मात्र पावसाचा जोर जास्त असल्यामुळे शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले व शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले.

 

या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी पिंपळगावचे उपसरपंच सौ पद्मजा धनंजय देशमुख तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल देशमुख यांनी संपूर्ण गाव परिसरातील शेताची पाहणी केली.आणि झालेल्या नुकसानीची कल्पना तलाठी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील धीर दिला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now