⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जिल्ह्यातील १ हजार १८० गावांत‎ ड्रोन सर्वेक्षण पूर्ण ; भूमिअभिलेख अधीक्षकांची माहिती


जळगाव‎ लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ‎जिल्ह्यातील १ हजार १८० गावांत‎ ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या ‎ ‎गावांमधील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड ‎ ‎देण्यास प्रारंभ झालेला आहे. शहरी भागातील ७/१२ उतारे बंद करण्याचा ‎ ‎निर्णय शासनाने घेतलेला आहे.‎ शहरी भागातील काही नागरिकांकडे ‎ ‎ ७/१२ उताऱ्यांसह प्रॉपर्टी कार्डही‎ आहे.

अशा नागरिकांचे ७/१२ उतारे‎ बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू‎ ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी‎ भूमिअभिलेख विभागाकडून‎ पडताळणी करण्यात येत असल्याचे‎ जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख‎ मगर यांनी सांगितले .‎ जिल्ह्यातील २६८ गावांचा यापूर्वी‎ पारंपरिक पद्धतीने सिटी सर्व्हे‎ ‎ करण्यात आला होता. या गावांचे ३‎ लाख ६७ हजार ८३७ मालमत्ता पत्रे‎ आहेत. १३ लाख २५ हजार मालमत्ता‎ पत्रे ऑनलाइन झालेली आहेत.‎ ११८० गावांमध्ये गावठाण‎ मिळकतींचे नकाशेच नव्हते. या‎ गावांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात‎ आले. या गावांमधील ग्रामस्थांना‎ जीआयएस प्रणालीवर आधारित‎ ‎ मालमत्ता पत्रिका मिळण्यास प्रारंभ‎ झाला आहे. शहरातील ७/१२ बंद‎ करून प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा‎ निर्णय भूमिअभिलेख विभागाकडून‎ घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात‎ सिटी सर्व्हे झालेल्या शहरातील‎ नागरिकांचा ७/१२ उताराही सुरू‎ आहे. त्यांचा ७/१२ उतारा बंद करून‎ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवणार आहे.‎

दाेन्ही प्रकारातील डाटा संकलन‎ काही नागरिकांकडे ७/१२ उताऱ्यासह प्रॉपर्टी कार्डही आहे, अशा‎ नागरिकांचा ७/१२ उतारा बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख‎ विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे. प्रॉपर्टी कार्ड व ७/१२ उतारा‎ सुरू असलेल्या नागरिकांचा प्रणालीवर शोध घेतला जात आहे. ज्यांच्याकडे‎ केवळ ७/१२ उतारा आहे, त्यांचाही शोध घेतला जाताे आहे. या दोन्ही‎ प्रकारातील डाटा एकत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर ७/१२ उतारे बंद‎ करून नागरिकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याची कार्यवाही करण्यात येणार‎ असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख मगर यांनी सांगितले.‎

दाेन्ही प्रकारातील डाटा संकलन‎ काही नागरिकांकडे ७/१२ उताऱ्यासह प्रॉपर्टी कार्डही आहे, अशा‎ नागरिकांचा ७/१२ उतारा बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी भूमिअभिलेख‎ विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे. प्रॉपर्टी कार्ड व ७/१२ उतारा‎ सुरू असलेल्या नागरिकांचा प्रणालीवर शोध घेतला जात आहे. ज्यांच्याकडे‎ केवळ ७/१२ उतारा आहे, त्यांचाही शोध घेतला जाताे आहे. या दोन्ही‎ प्रकारातील डाटा एकत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर ७/१२ उतारे बंद‎ करून नागरिकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याची कार्यवाही करण्यात येणार‎ असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख मगर यांनी सांगितले.‎

.