⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोर्चात नियमांचे उल्लंघन ; ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहे. असे असतानाही एकलव्य आदिवासी भिल्ल समाज संघटनेकडून सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह सुमारे ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकलव्य आदिवासी भिल्ल समाज संघटनेकडून सोमवारी विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कोरोनाचा संसर्ग असतांना अनावश्यक गर्दी जमविली होती. 

याप्रकरणी मंगळवारी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, सुर्यकांत पवार, कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, रवी मोरे, अक्षय मालचे, विशाल मोरे, देविदास बहीरम, विजय ठाकरे, राजू सोनवणे, मोतीलाल सोनवणे यांच्यासह सुमारे ३०० ते ४०० जणांविरुद्ध करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ब साथीचे रोग अधिक २,३,४ यासह महाराष्अ्र पोलीस अधिनियम ३७(१), ३७(३), १३५ प्रमाणे पोलिस कर्मचारी उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजयकमार सोनार हे करीत आहे.