---Advertisement---
जळगाव जिल्हा

खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी होणार दूर; शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम हे शेती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यातील शेतकरी हा हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे.

FR2

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खरीप हंगाम 2025 च्या आढावा बैठकीमध्ये, निविष्ठांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेसंदर्भात शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले. त्यानुसार, कृषि आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

---Advertisement---

या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. WhatsApp क्रमांक: 9822446655, टोल फ्री क्रमांक: 18002334000 , ई-मेल: controlroom.qc.maharashtra@gmail.com निविष्ठांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिंकींग यासारख्या बाबींवर आधारित तक्रारी या माध्यमांद्वारे नोंदवता येतील. तक्रारी नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा संक्षिप्त तपशील नमूद करावा.

ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो WhatsApp किंवा ई-मेलवर पाठविल्यास तक्रारीचे निराकरण करण्यात अधिक सुसूत्रता येईल. ज्या शेतकऱ्यांना WhatsApp वापरणे शक्य नाही त्यांनी वरील क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. नियंत्रण कक्ष दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत राहील. शेतकऱ्यांनी या सेवांचा लाभ घेऊन खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment