⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगावात घरातून २ लाख ७० हजार रूपयांची रोकड चोरीला ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । शहरातील गुजराथी गल्लीतील घरात अज्ञात चोरट्यानी २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आलीय. दरम्यान, याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिना दिशेन मल्लारा (वय-५८) रा. गुजराथी गल्ली, जुने बी.जे. मार्केट हे आपल्या मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. मुलगाचा व्यवसाय असल्यामुळे ते कामासाठी ११ मार्च रोजी सकाळीच निघुन गेले होते. तर सकाळी १० वाजता मिना मल्लारा आणि त्यांची सुन हे दोघे कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरात तीन मोलकरीण आणि नात घरात होते.

दुपारी काम आटोपून सुनेसह मिना मल्लारा घरी परतल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांनी घरातील कपाट उघडले असता त्यांना कपाटात ठेवलेले २ लाख ७० हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यांनी मुलगा आणि सुन यांना विचारणा केली असता त्यांनी आपण घेतले नसल्याचे सांगितले.

जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून हकीकत सांगितली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी मिना मल्लारा यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदिप पाटील करीत आहे.

पिस्टल हाताळताना गोळी सुटली ; खडक्यातील अल्पवयीन जखमी

0
a minor was injured while firing a pistol

भुसावळ तालुक्यातील खडका येथे तिघे मित्र एका जागेवर बसले असतानाच अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याची घटना गुरुवारी रात्री 10 ते 10.30 दरम्यान ही घटना घडली. 

हे प्रकरण वाढून आपल्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी मित्रांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेत खडका मिलजवळ तीन संशयीतांनी लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐवज न दिल्याने संशयीताने गोळीबार केल्याची माहिती तालुका पोलिसांना रात्री उशिरा दिली. 

या प्रकाराने पोलिस यंत्रणा पुरती हादरली व कामाला लागली. जखमीला तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले तर जखमी व त्याच्यासोबत असणार्‍यांनी दिलेल्या घटनास्थळावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकार्‍यांनी धाव घेत स्पॉट व्हेरीफिकेशन केले असता तेथे रक्ताचे डाग वा काही अप्रिय घडले नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला व जखमीसोबत असलेल्या मित्रांची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी लूट झाली नसल्याची कबुली देत घडल्या प्रकाराची कबुली दिली.

तालुका पोलिसांना लूट झाली नसताना पोलिसांना खोटी माहिती देवून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सुरज कोळी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. संशयीतांनी अल्पवयीनाकडून पिस्टल हातळतांना गोळी सुटल्याची कबुली दिली आहे. संशयीताने हे पिस्टल कुठून व कोणत्या उद्देशाने आणले? याचा खोलवर तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अल्पवयीन तरुणासह वरील चार संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत सांगितले.

पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अमोल पवार व कर्मचार्‍यांनी आरोपींना पकडन्यात कारवाई केली.   

भुसावळ शहर व तालुक्यात पोलिसांची दिशाभूल करून खोटा गुन्हा दाखल करणार्‍यांची यापुढे देखील गय केली जाणार नसल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले . मूळ घटना लपवून त्याला दुसर्‍या घटनेचे स्वरूप देण्याचा प्रकार तालुक्यातील खडका येथे उघड झाला असून पोलिसांना खोटी माहिती देणार्‍यांना आरोपी करण्यात आल्याचेही  वाघचौरे यांनी सांगितले.

जळगावातील जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद

0
good response first day of janta curfew in jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व संसर्गाची साकळी तोडण्यासाठी १२ ते १४ मार्चदरम्यान जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी जळगावकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

कोरोनाचे रूग्ण जळगाव शहरात प्रचंड प्रमाणावर वाढत असल्यामुळे विविध संघटनांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी काल ११ मार्च रोजी रात्री ८ वाजेपासून जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री देखील शहरात शांतता होती. जनता कर्फ्यूच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरीकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणीही बाहेर पडून नये असे आहवान, आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.  कोणत्याही भागात गर्दी होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनावर जबाबदारी सोपवली आहे.

जनता कर्फ्यू असल्‍याने मार्केट, वेगवेगळी दुकाने, भाजीबाजार सर्व काही बंद असल्‍याने यासाठी होणारी गर्दी आज पाहण्यास मिळत नाही.  जनता कर्फ्यू हा जनतेने स्वयंस्फूर्तीने पार पाडायचा असला तरी, या कर्फ्यूमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीपासून सुरवात झाली असून, पहिल्या दिवसापासून नागरिकांसह व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्‍याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील सुभाष चौक, सराफ बाजार, दाणाबाजार, बळीराम पेठ, टॉवर चौक, गोलाणी मार्केट व फुले मार्केट परिसर, बस स्थानक या नेहमी वरदळ असलेल्‍या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी 4.5 कोटींचा निधी मंजूर

0
raksha khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील रस्ते व पुल यासारख्या विविध विकास कामांसाठी रु.४.५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांना चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिले होते.

सदर कामांसाठी नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती व सदर कामांसाठी खासदार रक्षाताई खडसेंचा बऱ्याच दिवसापासुन पाठपुरावा सुरु होता. अखेर खासदारांच्या या मागणीचा राज्यसरकारने सकारात्मक विचार केला असून मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील विकास कामांसाठी निधी मिळाला आहे.

सदर कामांना मंजुरी मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून खासदार रक्षाताई खडसे यांचे आभार मानले आहे. मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील मंजूरी मिळालेल्या कामांमध्ये मुक्ताईनगर तालुका अंतर्गत घोडसगाव ते रा.मा-५ जुने कुंड मुक्ताईनगर ते नवी कोथळी ते राज्यमार्ग ६ रस्ता प्रजिमा-२३ किमी ९/१००ते १२/५०० ची सुधारणा करणे व किमी ९/६०० मध्ये आरसीसी बॉक्स सेल मोरीचे बांधकाम करणे कामांसाठी अंदाजित मंजूर किंमत रु.२२५ लक्ष. रावेर तालुका अंतर्गत रा.मा-४५ खिरोदा चिनावल वडगाव निंभोरा बालवाडी तांदलवाडी हतनूर रस्ता रा.मा.-४६ किमी १७/४०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे रु.६० लक्ष. रावेर तालुका अंतर्गत रा.मा.-४५ खिरोदा चिनावल वडगाव निंभोरा बालवाडी तांदलवाडी हतनूर रस्ता रा.मा.-४६ किमी १७/७०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे रु.७० लक्ष आणि बोदवड तालुका अंतर्गत कोल्हाडी निमखेड रा.मा.-२७० ते हरणखेड चिखली मानूर खु. ते रा.मा.-४६ ते शेलवड रास्ता रा.मा.-७५३ एल प्रजिमा-९० किमी ७/०० ते २०/०० ची सुधारणा, रुंदीकरण व हरणखेड गावानजीक संरक्षक भिंत बांधकाम करणे रु.१०० लक्ष इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती खासदार संपर्क कार्यालय मुक्ताईनगर यांचे कडून देण्यात आली आहे.

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात झाला लघुरुद्र स्वाहाकार

0
laghurudra swahakar took place in shri mangaldev graha mandir

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे सायंकाळी लघुरुद्र स्वाहाकार विधी झाला.  कोरोनामुळे  सहभागीची संख्या बारा ज्योतिर्लिंगाच्या पार्श्वभूमीवर फक्त बारा ठेवण्यात आली होती. 

त्यात विनोद अग्रवाल, हेमंत पवार,विनोद कदम, निलेश साळुंखे, राहुल पाटील,आर. जे. पाटील, कौशल पानसे ,डॉ. जितेंद्र पाटील,डॉ. ज्ञानेश पाटील प्रसन्न पारेख (बंडू जैन)आशिष चौधरी व उमाकांत हिरे यांचा समावेश होता.

सहभागीची संख्या सिमित असली तरी  धार्मिक विधीतील सर्व सोपस्कार , एकूणच भव्यता सजावट व स्वच्छता नेहमीप्रमाणेच अव्वल दर्जाची होती. उपस्थितांनी त्याबाबत खूपच समाधान व्यक्त केले. प्रसाद भण्डारी मुख्य पुरोहित होते .त्यांना मंदिरातील पुजारी

तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य,अक्षय जोशी,गणेश जोशी,भटू पाठकअंकुश जोशी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे आणि सेवेकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

विशेष सुचना : कल्याण-कसारा खंडात १३ व १४ मार्चला रेल्वेचा ब्लॉक, ‘या ‘8 गाड्या रद्द

0
railway block in kalyan kasara section

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा खंडात शनिवार, रविवारी (दि.१३ व १४) असे दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पाॅवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ८ गाड्या रद्द, तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री २ वाजेपासून सकाळी ७.२५ वाजेपर्यंत तीन स्टेशनवर हा ब्लॉक असेल. त्यात शनिवारी रात्री २.१५ वाजेपासून ते सकाळी ७.१५ पर्यंत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशनदरम्यान क्रॉसिंग गेट ६१ मध्ये आरएच गर्डरचे काम केले जाईल. पहाटे २.२५ ते सकाळी ७.२५ या वेळेत आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्राॅसिंग गेटचे आरएच गर्डरचे काम होईल. तर पहाटे २ ते सकाळी ४.३० पर्यंत शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले जातील. या कामांमुळे ८ विशेष रेल्वे गाड्या रद्द, तर दाेघांच्या मार्गात बदल आहे. याते अनुक्रमे डाउन मुंबई-अदिलाबाद (दि.१२), अप अदिलाबाद-मुंबई (१३ मार्च), डाउन मुंबई-सिकंदराबाद (दि.१४), अप सिकंदराबाद-मुंबई (दि.१३) डाउन मुंबई-नांदेड (दि.१४), अप नांदेड-मुंबई (दि.१३), अप जबलपूर-कोईमतूर (दि.१३) आणि डाउन कोईमतूर- जबलपूर (दि.१५).

कल्याण आणि टिटवाडा दरम्यान आणि निलजे स्टेशनमध्ये मुंबई-हावडा (दि.१४), एलटीटी-प्रयागराज (दि.१४), एलटीटी-गोरखपूर (दि.१४) आणि मडगाव-नागपूर विशेष गाडी १३ मार्चला थांबवण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील अमरावती-मुंबई ही गाडी १३ मार्चला अमरावती स्टेशनपासून तीन तास रि-शे़ड्युलिंग करण्यात येईल. अप गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्चला गाेंदिया स्टेशनपासून ३ तास विलंबाने सुटेल.

अप गोरखपूर-एलटीटी विशेष गाडी गाेरखपूर स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव-वसई रोड मार्गे एलटीटीला जाईल. हावडा-मुंबई विशेष गाडी हावडा स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव, वसई रोड मार्गे एलटीटी गाठेल. या दोन्ही गाड्यांना भिवंडी रोड येथे थांबा दिला आहे.

इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान १ ते ३ तासांपर्यंत थांबवण्यात येईल. यात नागपूर-मडगाव गाडी (दि.१३ मार्च), हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम (दि.१३), फिरोजपूर-सीएसएमटी (दि.१२), नागपूर-सीएसएमटी (दि.१३) या गाड्यांचा समावेश आहे.

खान्देशात तापमानाची चाळीशीकडे वाटचाल

0
temperature in khandesh

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । गेल्या तीन दिवसापासून मराठवाडा आणि लगतच्या भागात निर्माण झालेले चक्रीय वादळ गुरूवारी विरले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात वातावरणात बदल झालेला असून किंचित ढगाळ वातावरणामुळे खान्देशात गेल्या दाेन दिवसात तापमान ३८ अंशापुढे गेले आहे. 

वाढत्या तापमानाची चाळीशीकडे वाटचाल असतांना विदर्भावर मात्र अवकाळी पावसाचे ढग आहेत. येत्या दाेन दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस हाेण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविलेला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वातावरण किंचित ढगाळ हाेते. हे वातावरण शुक्रवारी निवाळेल. दरम्यान, विदर्भावर मात्र पुढील दाेन दिवस अवकाळी पाऊस हाेण्याची शक्यता आहे. १३ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहील. तर जळगाव जिल्ह्यासह खान्देशात तापमानाचा पारा ३९ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. गुरूवारी जळगावात कमाल तापमान ३८.७ अंश तर किमान तापमान १८ अंशपर्यंत हाेते. तापमानासाेबतच वाऱ्याचा वेग देखील ताशी १० किलाेमिटर पर्यंत वाढू शकताे.

भोगावती नदीपात्रात वरणगावच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
the body young man from varangaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । वरणगाव शहरातील नारीमळ्यातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विजय एकनाथ माळी (२८) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली.

याबाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नारी मळा येथील चांभारवाड्यातील रहिवाशी विजय माळी हा तरूण मंगळवारी कामावर गेला. परंतु तो बुधवारच्या दुपारपर्यत घरी परत आला नसल्याने त्याची आई वडिलाना काळजी वाटल्याने हरविल्या बाबत पोलीस स्टेशनला खबर देण्यासाठी बस स्थानक चौकात आले होते.

त्यांना ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा मुलगा रिक्षात बसुन कामावर जात असल्याचे सागीतल्याने ते घरी परत आले. थोड्यावेळाने मयत विजयचा चुलत भाऊ बळीराम माळी यांच्या मोबाईलवर त्यांच्या मित्राने संपर्क साधुन तुझा भाऊ आठवडे बाजारा जवळील पुलाजवळ मृत अवस्थेत असल्याची खबर मिळताच नातेवायीकाणी घटनास्थळी जाऊन खातरजाम करण्यासाठी गेले असता त्या मृतदेहाच्या शरिरावरील खुणा, उजव्या हातावर विजय नाव असे गोधलेले असल्याने त्याची खात्री झाल्याने मृतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालयात नेले.

मयत विजय घरात एकुलता एक मुलगा होता. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बळीराम विश्वानाथ माळी याच्या खबरीवरूण अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मजहर पाठण, नागेंद्र तायडे हे करीत आहे.

जनता कर्फ्यू सुरु असतांना अडचण असल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क…

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगावात कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावात ३ दिवसांचा जनता कर्फ्यू सुरु केला आहे. यादरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियंत्रण कशी सुरु करण्यात आले. आहे.

अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून

नागिरकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

पोलीस मुख्यालय : 02572223333/2235232

जिल्हाधिकारी कार्यालय : 02572217193/ 2223180