जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । ३२२ किलाे तिळाचे उत्पादन हाेत आहे. अन्य पीकांच्या तुलनेत भाव अधिक असला तरी उत्पादन कमी हाेत असल्याने शेतकऱ्यांचा कल कमी झालेला आहे. जळगाव जिल्ह्यात चाेपडा, यावल, भुसावळ, जळगाव, अमळनेर, पाचाेरा आणि जामनेर या तालुक्यात काही प्रमाणात तीळ पेरणी केली जाते. रावेर, मुक्ताईनगर, बाेदवड, एरंडाेल, धरणगाव, पाराेळा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यात मात्र शेतकऱ्यांनी तीळ या पीकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
जळगाव तेलबियांमध्ये माेठी मागणी असलेल्या तिळाचे उत्पादन अाणि पेरणी क्षेत्र माेठ्या प्रमाणावर घटले अाहे. शेतकऱ्यांचा अाेढा नगदी पिकांकडे असल्याने गेल्या दहा वर्षांत यात सातत्याने घट हाेत आहे. तीळ आयात करावी लागत असून, सध्या स्थानिक बाजारपेठेत तिळाचे दर प्रतिक्विंटल १०,३०० रुपयांच्या उच्चांकावर आहे.
इतर कृषी उत्पादनांमध्ये हे दर सर्वाधिक असून, त्यात वाढ हाेऊ शकते. देशभरात साडेचार लाख मेट्रिक टन तिळाची मागणी असताना गेल्या वर्षात केवळ १ लाख ७७ हजार मेट्रिक टनाचे उत्पादन झाले आहे. राज्यातील जळगाव, धुळे, लातूर, वाशिम, बुलडाणा, हिंगाेली या तीळ उत्पादक जिल्ह्यात तिळाचे क्षेत्र सातत्याने घटत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या २० वर्षांपूर्वी २५ हजार हेक्टरवर असलेले क्षेत्र सध्या ३०० हेक्टरपेक्षा खाली आले आहे.
काही प्रमाणात उन्हाळी तिळाची पेरणी केली जात आहे. तिळाची मागणी वाढलेली असताना त्या प्रमाणात उत्पादन नसल्याने बाजारपेठ सर्वस्वी आयातीवर अवलंबून आहे. गेल्या चार वर्षांत तिळाचे दर सतत वाढत आहेत. चांगल्या दर्जाची पांढरी तीळ १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल रुपये दराने मिळत आहे. चाेपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दाेन दिवसांमध्ये तिळाला सरासरी दर १०,३०० रुपयांपर्यंत दर मिळाला . राज्यभरात ३ लाख हेक्टर क्षेत्र तिळाचे राज्यभरात ३.७९ लाख हेक्टर एवढेच पेरणी क्षेत्र आहे. ८० ते ९० दिवसांमध्ये हे पीक हाती येत असले तरी मान्सूनच्या अनिश्चिततेने व नगदी पिकांच्या ओढ्यामुळे शेतकऱ्यांनी तिळाकडे पाठ फिरवली आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेशात अधिक आवक आहे.