वाईट बातमी : मान्सून आला उशिरा चालला लवकर

ऑगस्ट 29, 2022 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ ।  गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून यावर्षी मान्सून उशिरा आला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता मात्र आता अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हि खूप वाईट बाब आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मात्र, यावर्षी 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

rain alert 1 jpg webp

जून महिन्यात दडी मारलेल्या पावासानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार हजेरी लावली होती. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे शेतकरी समाधानी झाले आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला . विदर्भ आणि मराठवाड्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर चार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर 9 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला आहे. राज्यातला एकही जिल्हा असा नाही की जिथे समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या सर्वच भागात समाधनकारक पावसानं हजेरी लावली आहे.





Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now