जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । एरंडोल येथील रहिवासी नितीन उत्तम जयस्वाल यांनी येथील एसबीआय शाखेत अपघाती विमा ५०० रुपये भरून काढला होता. काही महिन्यापूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या वारसांना विम्याचा १० लाखांचा धनादेश नुकताच देण्यात आला.

एरंडोल एसबीआयचे व्यवस्थापक आशीष मेढे यांनी वारसदारांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याने विमा मंजूर झाला. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर, त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास विम्याची रक्कम उपयोगी ठरणार आहे. मृत जयस्वाल यांच्या पत्नी खुशबू जयस्वाल यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यावेळी मृताचे मोठे बंधू संदीप जयस्वाल, पत्नी खुशबू जयस्वाल व त्यांचा मुलगा व मुलगी यांचेसह सहाय्यक प्रबंधक मुकेश दलाल, क्षेत्रीय प्रबंधक सौरव पाटील, शाखा व्यवस्थापक अनुराधा नंदनवार, लेखापाल आशिक सोनवणे, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे कर्मचारी राहुल कदम, सचिन वैद्य उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- कर्जमाफी योजनेतून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ‘इतके’ हजार शेतकरी अपात्र?
- प्रवाशांना दिलासा ! जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
- जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव पोलिसांची पत्रकारांसाठी छायाचित्र स्पर्धा
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ
- जळगावात चातुर्मास पर्वाला आजपासून प्रारंभ







