⁠ 
बुधवार, मे 8, 2024

सरकारची जबरदस्त योजना! वर्षाला फक्त 12 रुपये भरून मिळेल लाखोंची मदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२४ । सरकारकडून प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. सरकारच्या या अपघाती विमा पॉलिसी अंतर्गत, अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेसाठी दावा केला जाऊ शकतो. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते, ज्यासाठी वार्षिक प्रीमियम फक्त 12रुपये आहे. या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि तुम्ही अर्ज कसा करू शकता ते जाणून घेऊयात..

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेची (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) सुरुवात सरकारने 2015 मध्ये केली होती. भारतातील मोठ्या लोकसंख्येला सुरक्षा विमा कवच प्रदान करणे हा या विमा योजनेचा उद्देश आहे. यामुळेच यासाठी वार्षिक प्रीमियम इतका कमी ठेवण्यात आला आहे की गरीब व्यक्तीही या योजनेचा लाभ सहज घेऊ शकेल. या योजनेत वर्षाला फक्त ₹ 12 जमा करावे लागतात. या योजनेअंतर्गत, कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला 2 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक रक्कम दिली जाते. तर गंभीर दुखापत किंवा अपंगत्व असल्यास, ₹100,000 ची रक्कम प्रदान केली जाते. या विम्याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. त्याचा वार्षिक प्रीमियम 1 जूनपूर्वी खात्यातून कापला जातो.

कोण लाभ घेऊ शकतो ?
गरीब आणि मागासवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गरीब आणि मागासवर्गीय लोकांना कमी खर्चात विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळवून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. यासोबतच तो मागासवर्गीय किंवा गरीब वर्गातील असेल, तरच यासाठी अर्ज करू शकतो.

या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे. ज्या बँकेत ऑटो डेबिट सुविधा सक्रिय आहे, त्याच बँकेत खाते देखील असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन फॉर्म भरून सबमिट करता येतो. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही ऑनलाइन अर्ज करता येतो.