सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे तांदळाच्या किमती घसरल्या

सप्टेंबर 16, 2022 4:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । केंद्र सरकारने तांदळाबाबत मोठा निर्णय घेतला असून, त्यानंतर तांदळाच्या किमती 200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तुम्हीही रेशन खरेदी करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या आताचे नवीनतम दर काय आहेत. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयामुळे चीनमध्ये अन्न संकट निर्माण होऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे भारतात तांदळाच्या किमतीत घसरण झाली आहे.

rice jpg webp

तांदूळ किती स्वस्त आहे?
गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात तांदळाच्या भावात 100 ते 200 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारातील भावात अद्याप कोणतीही घसरण झालेली नसली तरी लवकरच किरकोळ बाजारातही तांदळाच्या दरात घट होणार आहे.

भारत हा तांदूळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर
चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक बाजारपेठेत भारतातील तांदळाचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे. त्यात 34.9 लाख टन बासमती तांदूळ होता.

भारतातील लोकांना तांदळाची कमतरता भासू नये
भारतातील चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासोबतच देशातील नागरिकांना तांदळाच्या टंचाईला सामोरे जावे लागू नये. महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार तांदूळ आणि ब्राऊन राईसवर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now