जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवा निमित्ताने काँग्रेस पक्ष्या तर्फे यावल तालुक्यातील विविध गावात भारत जोडो पदयात्रा थोरगव्हान, मनवेल, साकळी, वाडोदे, चिंचोली, नायगाव येथे माजी आमदार रमेश चौधरी यांच्या नेतृत्वात व तालुका अध्यक्ष मा. प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे अध्यक्षते खालील रॅली काढण्यात आली.

स्वत्रंत देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे, आणि आपला भारत देश सर्वांगीणदृष्ट्या सुजलाम सुफलाम राहावा ही सर्वांचीच मनोभूमिका आहे. आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना देशवासीयांसमोर मांडली

यावेळी आर.नाना पाटील, विनोद पाटील, सतीश दादा पाटील, सुरेश चौधरी, योगेश पालवे, सचिन तडवी, किशोर पाटील, तसेच शेखर बापु पाटील, कदीर खान, सरपंच संदीप सोनवणे ,अनिल जंजाळे, विकी गजरे, शेख सकलेन, धीरज सोनवणे, विकी सोनवणे, रोहन महाजन, आदी कार्यकर्त्या सह विविध गावातील नागरिक उपस्थित होते.







