जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद टोल प्लाझावरील कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व टोल प्लाझा कामगार यांनी काम बंदचा पवित्रा घेतला आहे.

पगार वेळेवर न देणे, कुठल्याही प्रकारचा भत्ता न देणे तसेच दादागिरीची भाषा करणे असे प्रकार सुरू असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या विरोधात बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कामगारांनी आंदोलन पुकारले. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहराध्यक्ष जितेंद्र बराटे शहर सचिन भालेराव, गोकुळ धनगर, सचिन भालेराव, गजेंद्र माळी, केतन बोंडे, समाधान सोळुंके, गजानन मराठे, लोकेश लोखंडे, मयूर झटके, दीपक जंगम, गिरीश चौधरी, भावेश रोटे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






