जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । गेल्या दोन दिवसांपासून थंडी पुन्हा परतली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान मंगळवारी सकाळी ७ अंश नोंदविले गेले. थंडीचा कडाका आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

एरव्ही मकर संक्रांतीच्या सणानंतर दूर पळणारी थंडी गेल्या काही वर्षापासून संक्रांतीनंतरच वाढत आहे. नागरिक स्वेटर, उबदार टोपी कपाटात ठेऊन देण्याच्या तयारीत असतानाच ते पुन्हा बाहेर काढावे लागत आहे. गेल्या आठवड्यात थंडी परतेल असे वाटत असताना सोमवारपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. रविवारी तर पाकिस्तानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाने जळगावात धूळ निर्माण केली होती.
जळगावचा पारा अचानक कमी झाला असून किमान १५ अंश असलेले तापमान ७ अंशावर येऊन पोहोचले आहे. नागरिकांची हुडहुडी वाढली असून दिवसा देखील थंडी जाणवत आहे. पारा खाली आल्याने नागरिकांनी विशेषतः वृद्ध, अस्थमा रुग्ण, लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य
- डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पर्यावरण दिनानिमित्त ३५१ रोपट्यांचे रोपण
- जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे आयोजन; नोंदणी कशी आणि कुठे कराल
- Rain Alert : आज राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला ; जळगावात कशी राहणार स्थिती?
- रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डाच्या चेअरमनाकडे मागणी