जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । गेल्या दोन दिवसांपासून थंडी पुन्हा परतली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यातील किमान तापमान मंगळवारी सकाळी ७ अंश नोंदविले गेले. थंडीचा कडाका आणखी वाढणार असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
एरव्ही मकर संक्रांतीच्या सणानंतर दूर पळणारी थंडी गेल्या काही वर्षापासून संक्रांतीनंतरच वाढत आहे. नागरिक स्वेटर, उबदार टोपी कपाटात ठेऊन देण्याच्या तयारीत असतानाच ते पुन्हा बाहेर काढावे लागत आहे. गेल्या आठवड्यात थंडी परतेल असे वाटत असताना सोमवारपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. रविवारी तर पाकिस्तानमध्ये आलेल्या धुळीच्या वादळाने जळगावात धूळ निर्माण केली होती.
जळगावचा पारा अचानक कमी झाला असून किमान १५ अंश असलेले तापमान ७ अंशावर येऊन पोहोचले आहे. नागरिकांची हुडहुडी वाढली असून दिवसा देखील थंडी जाणवत आहे. पारा खाली आल्याने नागरिकांनी विशेषतः वृद्ध, अस्थमा रुग्ण, लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
- ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी बत्तीगुल होते तेव्हा… भुसावळातल्या सभेतील प्रकार
- जळगावात भीषण अपघात ; दोन बालकांसह महिलेचा मृत्यू
- उद्धव ठाकरे जळगावात दाखल
- ग्राहकांसाठी आनंदवार्ता ; अक्षय्य तृतीयापूर्वी सोने-चांदीत मोठी घसरण
- मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अस्थीरोग तज्ञ डॉक्टरने लढवली अशी शक्कल