जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथे आत्या-मामांना चुलत भाच्यांनी गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षभर मेहनत घेऊन पीक घेतलेला १५० टन ऊस तीन भाच्यांनी परस्पर चोरून नेत विक्री केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या माया भारत बोरसे (देशमुख) वय-५० वर्षे या सध्या वारेगाव, ता.फुलंबी, जि.औरंगाबाद याठिकाणी पती भारत दिनकर बोरसे यांच्यासह राहतात. माया बोरसे यांना वडीलांकडुन वडीलोपार्जीत शेती चितेगाव येथे मिळाली आहे. शेतीचा शेतगट क्र.९ अ असा असून क्षेत्र ८४ आर एवढे आहे. दोन्ही पती पत्नी चितेगाव येथे येवून जावुन शेती व्यवसाय करतात. पंजाब वसंतराव देशमुख, बिपीन वसंत देशमुख, दुर्गेश वसंत देशमुख सर्व रा. चितेगाव, ता. चाळीसगाव हे नात्याने त्यांचे चुलत भाचे आहेत.

बोरसे दाम्पत्याने २ एकर शेतात ऊसाचे पिक लावलेले होते व त्याची मशागत करून आज पावेतो त्याचे संगोपण केले. सध्या त्यांच्या शेतातीतल ऊस तोडणीला आलेला होता. परंतू त्यांची तब्बेत बिघडल्यामुळे दोन्ही दि.८ डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ पावेतो घरीच होते. दि.१० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते शेतात आले असता तेथे त्यांना शेतातील ऊसाचे पिक कोणीतरी कापणी करुन घेवुन गेल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी चितेगाव येथील मुकादम अरुण चांगदेव मोरे यांना विचारपुस केली असता, पंजाब वसंत देशमुख, बिपीन वसंत देशमुख आणि दुर्गेश वसंत देशमुख सर्व रा.चितेगाव, ता.चाळीसगाव अशांनी शेतातील संपुर्ण २ एकर शेतात पेरलेला अंदाजे १०० से १५० टन ऊस किंमत अडीच ते ३ लाख रुपयांचा मजुरांच्या मदतीने कापणी करुन चोरी करुन घेवुन गेले आहेत.
आत्याच्या शेतातील अंदाजे तीन लाखांचा ऊस कापून नेत चोरी केल्याप्रकरणी माया बोरसे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी चाळीसगाव पोलिसात पंजाब वसंत देशमुख, बिपीन वसंत देशमुख आणि दुर्गेश वसंत देशमुख सर्व रा.चितेगाव, ता.चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक संजय ठेंगे करीत आहेत.
हे देखील वाचा :
- जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
- भडगाव हादरले ! दारूच्या पैशांवरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पती अटकेत
- लाडक्या बहिणींसाठी अखेर ‘गोड बातमी’! अदिती तटकरेंची मोठी घोषणा, लाखो महिलांचे टेन्शन मिटले!
- न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
- अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जळगाव जिल्ह्यातील ५३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध!











