जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ७ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
- जामनेर तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले
- जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने केळीचा भाव क्विंटल मागे ‘इतक्या’ रुपयांनी वाढला ; शेतकऱ्यांना दिलासा
- Jalgaon : खरीप हंगामासाठी पीकनिहाय कर्जदर निश्चित, केळी-कापूससाठी मिळणार इतके रुपये..
- भाव मिळत नसल्याने मुक्ताईनगरातील शेतकऱ्याने केळी बाग उपटून फेकली