जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल महसूल व वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे कोळसा भट्ट्या बिनधास्तपणे सुरू झालेल्या आहेत. याकडे यावल पूर्व-पश्चिम वनक्षेत्रपाल व तहसीलदार यांचे दुर्लक्ष आहे का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
यावल पूर्व-पश्चिम वनविभाग कार्यालय तसेच यावल तहसील कार्यालयापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बोरावल,टाकरखेड़ा,भालशिव पिंप्रि परिसरात तसेच हतनूर धरण पाटाच्या आजूबाजूस तसेच तापी नदीच्या किनारपट्टी या भागात हजारो बाभुळ व इतर वृक्षांची अनाधिकृतपणे कत्तल करून त्या लाकडांची भट्टी लावून लाकडे जाळून हजारो टन कोळसा निर्मिती करण्याच्या भट्ट्या सुरू झालेल्या आहेत. याकडे यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल तसेच यावल तहसीलदार यांनी आपले लक्ष केंद्रित करून कोळसा भट्टी माध्यमातून कोळसा विक्री व्यवसाय करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी, मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे.
हे देखील वाचा :
- शरद पवार शनिवारपासून दोन दिवस जळगाव, धुळे जिल्हा दौऱ्यावर ; असे आहे कार्यक्रमाचे नियोजन
- २९ सप्टेंबर रोजी गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा
- एक लाखाची लाच घेताना पारोळ्याच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटरला अटक
- जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज, 30 सप्टेंबरपर्यंत अशी राहणार स्थिती?
- महिला आयोगाच्या जनसुनावणीत 94 प्रकरण दाखल ; तीन पॅनल कडून कार्यवाही