जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने डोक्यावर वाढलेला कर्जाचे डोंगरामुळे नैराश्य आल्याने भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वेगाडी झोकून देत आत्महत्या केली. छबीलदास शामराव कोळी (49) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत असे की, साकेगाव येथील शेतकरी छबीलदास शामराव कोळी यांनी शेती कामासाठी बँकेतून कर्ज काढले होते. अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने डोक्यावर वाढलेला कर्जाचे डोंगरामुळे नैराश्य आल्याने छबीलदास कोळी यांनी दत्त मंदिरापुढे वांजोळा मार्गावर असलेल्या रेल्वेलाईनवर खांबा क्रमांक 438/27,439/1 जवळ स्वतःला रेल्वे गाडी खाली झोकून देत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, सहा.निरीक्षक अमोल पवार, कॉन्स्टेबल वाल्मीक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याबाबत भूषण गणेश मराठे या रेल्वे कर्मचार्याने खबर दिल्याने तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास वाल्मीक सोनवणे करीत आहेत. दरम्यान, मतय शेतकर्याच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. ते ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सपकाळे यांचे चुलत भाऊ होत.
हे देखील वाचा :
- जळगावकरांनो काळजी घ्या! 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार, IMD चा अंदाज
- TVS ची लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच ; किंमत अन् फीचर्सबद्दल जाणून घ्या
- जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी
- ऑनलाईन पेक्षा स्वस्त आयफोन जळगावात; iPhone 13 मिळवा फक्त ४० हजार रुपयात
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस उत्साहात संपन्न