कुरंगी येथे दहशत माजवलेल्या वानराला अखेर पकडले

नोव्हेंबर 10, 2021 6:00 PM

 

download 29

गेल्या तीन महिन्यांपासुन कुरंगी गावात हल्लाखोर वानराने १०० च्या वर दुचाकी गाड्यांचे नुकसान केले होते.एवढेच नव्हे तर तो मागील ८-१० दिवसांपासुन गावातील नागरीक व महिला आणि लहान मुलांवर हल्ला चढवत जवळपास १५-२० लोकांवर हल्ला केल्याने एकच दहशत परीसरात माजली होती.हे वानर आल्यानंतर एकच कल्लोळ आणि धुमाकूळ माजली होती.

शेवटी वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी देवरे साहेब यांनी अजयकुमार जैस्वाल यांनी फोन करून सुचना दिल्यानंतर आपल्या पथकासह गावात दाखल होऊन आज आतिषजी चांगरे यांच्या मेहनती नंतर तब्बल दोन तासानंतर हल्लाखोर दोन वानरांना पकडण्यात फार मोठे यश आले असुन – या कामगिरीनंतर कुरंगीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.समस्त कुरंगी नागरीकांतर्फे आतीष’जी चांगरे आणि वनविभागाचे अधिकारी देवरे साहेब व त्यांचे पथकातील सदस्य – अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now