गारबर्डी धरण ‘ओव्हरफ्लो’; शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

सप्टेंबर 6, 2021 5:36 PM

 

0001 7299816314 20210906 173021 0000 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज | ईस्हाक शेख पाल | सुकी नदीवरील रावेर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले गारबर्डी धरण १०० टक्के भरल्याने ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. त्यामुळे सुकी नदीपात्रात पाणी वाहायला लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

या धरणात साधारणतः ५०.१६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे धरण भरले

 

असून या पुढील नदीकाठी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांनी नदी पात्रातून वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रवाह सुकी नदी पात्रात संथगतीने वाहत असून लोहारा, उटखेडा, चिनावल, निंभोरा, दसनूर अशी वाहत जाऊन बलवाडीजवळ सुकी नदी तापी नदीत विलीन होते. या नदीत पाणी वाहू लागल्यानंतर या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यासाठी त्याचा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now