वाचा.. उद्यापासून जळगाव जिल्ह्यात काय-काय किती वाजेपर्यंत असणार सुरू

जून 6, 2021 6:13 PM

मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यसरकार ५ टप्प्यात अनलॉक करणार आहे. राज्याच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश पारित केले असून त्यात त्यांनी काही निर्बंध घालून दिले आहेत. दुकाने सकाळपासून रात्री ९ पर्यंत खुली असणार असून त्यातही एका वेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. लग्न सोहळे आणि विविध कार्यक्रमांसाठी मर्यादित उपस्थितीचे बंधन घालून देण्यात आले आहे.

lockdown unlock

अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने / आस्थापना : रात्री 09.00 पर्यंत
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने / आस्थापना (Non- Essential) : रात्री 09.00 पर्यंत

सर्व Essential व Non-Essential प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काउंटर समोर एका वेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. तसेच दुकान मालक / चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बैंक काउंटर प्रमाणे काय/ प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पड़दा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी व दुकानाच्या आतील काऊंटरमध्ये Face Shield चा वापर करणे बंधनकारक राहील.

लग्न समारंभ, अंत्यविधी ५० लोकांची उपस्थिती

जळगाव जिल्ह्यात सोमवार पासून माॅल्स, थिएटर, जीम, सलून, स्पा, हाॅटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 9 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरू होणार.

सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रम 2 तासाच्या आत 100 लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. लग्न समारंभ, अंत्यविधीचे कार्यक्रम एकावेळी 50 लोकांच्या उपस्थितीत करता येतील.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश.

WhatsApp Image 2021 06 06 at 17.47.41

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now