भुसावळमार्गे एलटीटी-रक्सौल गाडीच्या ३६ फेऱ्या; रेल्वे प्रवाशांना दिलासा

ऑक्टोबर 8, 2024 3:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२४ । जळगाव | रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रशासनाकडून एलटीटी मुंबई ते रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांच्या ३६ फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या गाडीला भुसावळ येथे थांबा आहे. एलटीटी मुंबई रक्सौल अतिजलद विशेष गाडीच्या ३६ फेऱ्या होतील.

train jpg webp

०५५८६ क्रमांकाची गाडी ६ ऑक्टोबर ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दर रविवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सुटेल आणि रक्सौल येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या १८ फेऱ्या होतील. तर ०५५८५ क्रमांकाची विशेष गाडी ४ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत दर शुक्रवारी रक्सौल येथून दुपारी ४.५५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता एलटीटी स्थानकावर पोहोचणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now