पूरग्रस्तांपर्यंत पोहचली सेवारथ परिवाराची मदत

सप्टेंबर 1, 2021 12:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । चाळीसगावात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो नागरिकांना फटका बसला आहे. जळगावातील सेवारथ परिवारतर्फे कपडे, खाद्य पदार्थासह विविध साहित्य मदत म्हणून त्यांना पाठविण्यात आले.

995468ba b02a 4697 8bc1 58d89f3152d8

सेवारथ फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या मदतीमध्ये १२५ साड्या, १०० चटई, २७० फरसाणचे पाकीट, १२० बिस्किट पाकिटे, पाण्याच्या बाटल्याचे २०० खोके तसेच सोबत दोन रुग्णवाहिकांसह मदतीसाठी १२ कार्यकर्ते रवाना झाला आहे. अजून काही मदत लागल्यास देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सेवारथ संस्थेमार्फत दिलीप गांधी, डॉ.रितेश पाटील, डॉ. नीलिमा सेठिया यांनी सांगितले. यासाठी चटई असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी, राजू अडवाणी, विजय रेवतानी, कवी कासार यांनी मदत केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now