आईपाठोपाठ पाच दिवसांनी चिमुरड्याने घेतला अखेरचा श्वास

सप्टेंबर 1, 2021 3:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ ।  खंडाळा येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच बरोबर तिच्या ३ व ९ वर्षीय मुलांना देखील विषबाधा झाल्याचे समाेर आले होते. यापैकी मोठा मुलगा श्रेयस याचा नाशिक येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. आईपाठोपाठ पाच दिवसांनी चिमुरड्याने अखेरचा श्वास घातला.

5f0d4757 db47 4ba3 9b9b 7f7c663f9b99 jpg webp

खंडाळा येथील अश्विनी चाैधरी या विवाहितेने घरात काेणीही नसताना बुधवारी (दि.२५) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेच्या काही वेळाने तिची दोन्ही मुले अनुक्रमे प्रणव (वय ३) आणि श्रेयस (वय ९) या दाेघांना विषबाधा झाल्याचे समाेर अाले हाेते. यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे उपचाराअंती प्रणवच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी रात्री सुटी झाली. मात्र, श्रेयसच्या शरीरात जास्त प्रमाणात विष भिनल्याने उपचार सुरू होते. येथे त्याच्या प्रकृतीत दोन दिवसानंतर काहीसी सुधारणा झाली होती. मात्र, त्याची प्रकृती अचानक खालावली. यामुळे सोमवारी त्याला जळगावहून नाशिक येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथे त्याने शेवटचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी रात्रीच मृतदेह गावी खंडाळा येथे आणून अंत्यविधी करण्यात आले.
घटनेनंतर नाशिक येथे अकस्मात मृत्यूची नोंद

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now