⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भाजपचे ३ मंत्री बसणार घरी ? राजकीय चर्चांना उधाण !

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । राज्यात सध्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराची जोरादार चर्चा सुरू आहे. अश्यातच कोणत्याही परिस्थितीत १९ जूनपूर्वी विस्तार होणारच असा नवा दावा आता केला जात आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे ३ मंत्री घरी बसणार असल्याच्या चर्चा सुद्धा सुरु झाली आहे.

यंदा मंत्रीपद घेऊन सरकारची कामगिरी लोकांत पोचविण्यात कमी पडलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवू न शकणाऱ्यांना ‘नारळ‘ मिळू शकतो. असे म्हणाले जात आहे.

राज्यमंडळाच्या नव्या विस्तारा बाबत विचार करूनच निर्णय घेतला जाणार आहे. निवडणुकीत एक-एक जागा निवडून आणण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्यांनाच मंत्रीपद दिले जाईल. सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासह वीसजण मंत्रीमंडळात आहेत. यातील कुणाचे मंत्रीपद जाणार याचा अंदाज इतर कुणाला नसला तरी शाह-शिंदे व फडणवीस यांना नक्की आहे.