⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

शासनाच्या ‘या’ योजनांचा होणार शेतकऱ्यांना बंपर फायदा !

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ ।  नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्वपुर्ण बैठकीत मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे आणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. र्पयायी राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची निधी देते. त्याच धर्तीवर राज्य सरकारही 6 हजार रुपये निधी देणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून एकूण 12 हजारांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातील एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्याच शेतकऱ्यांना राज्य सरकारचा ही लाभ मिळेल.