जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । प्रेमीयुगलांचे वृत्त अनेकांना वाचायला आवडते. असेच एक वृत्त जामनेर तालुक्यात समोर आले आहे, वडाळी येथील मुलगा आणि ढालगाव येथील मुलगी हे प्रेमीयुगल मागील चार दिवसांपासून पळून गेले होते. ते सोमवारी थेट पहूर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या संमतीने त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न लावले. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर लग्नाचा बार उडाला.

वडाळी येथील अमीन गंभीर तडवी (वय २१) व ढालगाव येथील इरशाद जब्बार तडवी (वय २१) यांचे एकमेकांवर प्रेम होते. घरातील मंडळी लग्नाला विरोध करतील म्हणून दोघांनी गुरुवारी (दि.१०) पळून जात थेट अहमदाबाद गाठले. नंतर सोमवारी (दि.१४) दोघे पहूर पोलिस ठाण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्यांची समजूत काढली, परंतु प्रेमीयुगलाने आमचे लग्न लावून देण्याची विनंती केली. त्यामुळे इंगळे यांनी दोघांच्याही नातेवाईकांना बोलावून माहिती दिली. यावेळी जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, पहूरपेठचे उपसरपंच शाम सावळे, वडाळीचे माजी सरपंच सुधाकर पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोघांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पोलिस ठाण्यात त्यांचे लग्न लागले.

हे देखील वाचा :
- डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
- ‘गोवंशाची कत्तल केली’ म्हणत ५ लाखांची मागणी; चोपड्याच्या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा
- जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? वाचा हवामान अंदाज








