जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरात मार्गावर भाजीपाला विक्रीची दुकाने लावणाऱ्या ८ जणांना शहर वाहतूक शाखेने बुधवारी नाेटीस बजावली.
कोरोना काळात बाजाराचे विक्रेंद्रीकरण झाल्यावर काही भाजीपाला विक्रेते शहरातील डाॅ.आंबेडकर मैदानावर दुकाने लावत होते. आता त्यांना मैदानावर बसू दिले जात नाही. त्यामुळे अनेक जण रस्त्यावर दुकाने लावतात. तेथे येणाऱ्या ग्राहकांमुळे रस्त्यावर गर्दी होऊन अपघात होऊ शकतो. दाेन दिवसांपूर्वीच अशी दुर्घटना झाली होती. त्यामुळे वाहतूक शाखेने विक्रेत्यांना रस्त्यावर दुकाने लावू नये अशा सूचना दिल्या होत्या. बुधवारी वाहतूक शाखेचे एपीआय स्वप्निल नाईक यांनी पुन्हा ताेंडी सूचना दिल्या. तरीही विक्रेते न उठल्याने ८ जणांना नोटीस बजावण्यात आली. प्रदीप पाटील, सुनील शिंदे, भाऊसाहेब पाटील यांनी ही कारवाई केली.

हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ







