समाधानकारक बातमी : हतनूर धरणात मुबलक पाणी साठा उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। हतनूर धरणातून जिल्हातील प्रमुख शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. यातच यंदा सूर्य जास्तच आग ओकत असल्याचे दिसत आहे. मात्र हतनूर धरणात गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ८.६३ टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे.

hatnur dama jpg webp

यावर्षी मे महिन्याच्या १० तारखेपर्यंत उन्हाळा जाणू लागला नव्हता. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात झालेले आहे. मात्र ११ तारखेपासून सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात पाऊस सुरू होणार असल्याने शासन जुलै, ऑगस्टसाठी पाणी संरक्षित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. साठी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची जळगावला नुकतीच ठक पार पडली.

हतनूर धरणात गेल्यावर्षी १२ मे रोजी २११.३५० मीटर पाणीपातळी २५०.५० दलघमी साठा, ११७.५० तर २० उपयुक्त साठा व ४६.०८ टक्के १.४८ व पाणीसाठा होता. यावर्षी १२ तारखेला जरी र २११.८३० मीटर पाणीपातळी, ५९२.५० तरीसु दलघमी साठा, १३९.५० उपयुक्त साठा यावर्ष व ५४.७१ टक्के पाणी धरणात आहे.

त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ८६३ टक्के पाणीसाठा धरणात जास्त आहे. २०२२ मध्ये ०८ ते १२ मे या कालावधीत उपयुक्त साठा ३.७ दलघमी कमी झाला होता. यावर्षी ८ ते १२ मे या कालावधीत ०.५ दलघमी उपयुक्त जलसाठा कमी झाला आहे. २०२२ मध्ये ८ ते १२ मे या कालावधीत १.६९ दलघमी बाष्पीभवन झाले होते, तर २०२३ मध्ये या कालावधीमध्ये १.४८ दलघमी बाष्पीभवन झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now