⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | शेतकऱ्यांनो खरीप पिकांची काळजी घ्या ! जळगाव जिल्ह्याला आगामी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो खरीप पिकांची काळजी घ्या ! जळगाव जिल्ह्याला आगामी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला असून यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यात पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

राज्यात आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर ११ सप्टेंबरलाही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला देखील आगामी दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र काल सोमवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
हवामान खात्याने आज जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. तर नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यातील अनेक धरणं शंभर टक्के भरली
पावसाची संततधार सुरु असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील काही धरणं काठोकाठ भरली आहे. त्यामुळे वर्षभराचा पाणीप्रश्न मिटलाय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.