---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

पीडब्ल्यूडी-मनपा रस्त्यांच्या वादाचा विषय २ दिवसात मार्गी लागेल – पालकमंत्री

gulabrao patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । शहरातील मुख्य सहा रस्ते हे बांधकाम विभागाने २०१७ साली स्वतःकडे हस्तांतरित करून घेतले होते. यामुळे याठिकाणी महापालिकेला रस्त्यांची डागडुजी करायला किंवा नवीन रस्ते तयार करायला कोणताही अधिकार उरलेला नाही. बांधकाम विभागाच्या या पवित्र्यामुळे बांधकाम विभागाचा आणि महानगरपालिकेचा वाद विकोपाला गेला आहे. मात्र याबाबतचा सोक्षमोक्ष दोन दिवसात बैठक घेऊन मी सोडवण्याचा प्रयत्न करतो असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

gulabrao patil

यावेळी बांधकाम विभागाने आपली बाजू मांडताना सांगितले की, आम्ही हे रस्ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तयार आहोत मात्र त्याच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण हे महानगरपालिकेने हटवायला हवे.

---Advertisement---

याबाबत महानगरपालिकेचे प्रतिनिधी असलेले नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की, त्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. बांधकाम विभाग केवळ टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---