जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव येथे वाणिज्य आणि व्यवस्थापनातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत डिजिटल परिवर्तन या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या परिषदेत ५० हून अधिक संशोधकांनी सहभाग नोंदविला.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळेचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य वक्ते म्हणून पुणे येथील मास्टरकार्ड कंपनीचे लीड प्रॉडक्ट मॅनेजर वीरेंद्र सोनटक्के यांनी विस्तारक्षम बुद्धिमत्ता: ए आय’ वाणिज्य क्षेत्रावर काय परिणाम करत आहे आणि ती तुमच्याकडून काय अपेक्षा करते यावर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात डी.एन.सी. महाविद्यालय, जळगावचे प्राचार्य डॉ. पराग नारखेडे ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट, ग्राहक सेवा आणि डेटा अॅनालिटिक्समधील एआय मुळे होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डिजिटल व्यवसाय, सायबर सुरक्षा आणि शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे व तांत्रिक सत्रे घेण्यात आली.

सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. परिषदेला अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील होते.गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत एस. वारके, डॉ. वर्षा पाटील इन्स्टी,च्या प्रिन्सीपल डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. अनिल पी. डोंगरे, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. ए. पी. सरोदे, डॉ. सुषमा एस. पाटील आणि डॉ. माधुलिका सोनवणे यांची ऑनलाईन उपस्थीती व विशेष सहकार्य लाभले. डॉ. चेतन सरोदे यांच्या मार्गदर्शनानुसार संयोजक डॉ. प्राजक्ता आर. पाटील,परिषद सचिव म्हणून प्रा. आफरीन खान प्रा. स्मिता एन. चौधरी, प्रा. वैजयंती पी. असोदेकर, प्रा. आफरीन वाय. खान, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दीपक दांडगे, प्रा. चारुशीला चौधरी, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. प्रशांत बाहेकर, प्रा. लीना पाटील, प्रा. मानसी अहिरे आणि प्रा. साक्षी पोलाखरे यांनी परिश्रम घेतले








