जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे राज्यातील विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात नीचांकी तापमानाचा विक्रम झाला आहे. तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते असा अंदाज आहे.

फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात तापमान वाढून थंडी कमी होईल असा अंदाज होता; परंतु आठवड्यापासून तापमान सतत कमी होत आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्याने उत्तरेकडून राज्यात गार वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे वेस्टर्न डिस्टबन्सची स्थिती निर्माण झाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने गारठा आहे.

जिल्ह्यात रविवारी राज्यातील सार्वधिक कमी तापमानाची नोंद झाली होती. दिवसाचे तापमान तब्बल ३३ अंश असल्याने रात्री थंडीचा कडाका आणि दिवसा उन्हाचा चटका अशी स्थिती होती. जिल्ह्यात काल मंगळवारी जिल्ह्यात ७.५ अंश एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते असा अंदाज आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री जळगावात अतिथंडीने निराधार आणि बेघर चार जणांचा बळी गेला आहे. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा :
- मान्सून पुन्हा होणार पूर्ण क्षमतेने सक्रिय! जळगाव जिल्ह्यात पुढील ४-५ दिवस धोक्याचे?
- भुसावळातील माजी सैनिकाची १० लाखांची फसवणूक; सायबर ठगांनी असा लावला चुना?
- डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठ्ठल नामात झाले दंग
- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
- पदवीधरांना सरकारी बँकेत नोकरीचा चान्स; ५४५ जागांसाठी भरती, पगार ८५,९२०..









