⁠ 
सोमवार, मे 6, 2024

पुढील काही तास महत्वाचे ; जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना IMD चा इशारा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२४ । गेल्या तीन चार दिवसापासून राज्यातील काही भागात गारपीटसह धुमाकूळ घातला आहे. यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, आज उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार दुपारी जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

यामुळे कापणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढू शकते. कारण हवामान खात्याने जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना महत्वाचा अलर्ट दिला आहे.

जळगाव, धुळे, जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. नाशिक, नंदुरबार पुढील ३ ते ४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई हवामान खात्याने केले आहे.

जळगावात अवकाळी पावसाची हजेरी :
हवामान खात्याकडून आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारीसह मका पिके आडवी पडले.