⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

खान्देशात जोरदार पाउस : गावांचा संपर्क तुटला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । संपुर्ण देशात सध्या जोरदार पाउस सुरु झाला आहे. याचा फटका राज्यातील कित्येक जिल्ह्यांना बसला आहे. यातच उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाउस झाल्याने तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात नद्यांना मोठा पुर आला आहे.

य़ावेळी तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत तर सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे.

नंदुरबार जिल्‍ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत तर सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे.

अनेक भागातील शेतात पाणी शिरले आहे. यामुळे मुसळधार पावसाने शेताला तलावाचे रूप आले आहे. तळोदा तालुक्यातील सोरापाडा गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहे. बस सेवा बंद आहे.