जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्ता रुग्णांच्या सेवेत क्रांती घडवून आणते, निदान अचूकता सुधारते, उपचार योजना अधिक अचूक बनतात, प्रशासकीय कार्ये सुव्यवस्थित करतात, -ख ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवते, शेवटी, -ख आरोग्यसेवा व्यावसायिकांना चांगले परिणाम देण्यासाठी सक्षम करते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि साध्य केलेली उद्दिष्टे यावर मार्गदर्शन करण्यात आले.
प्राचार्य विशाखा गणवीर यांनी सर्वांचे स्वागत करत महाविद्यालयात कार्यप्रणाली व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे महत्त्व तसेच एआय तंत्रज्ञानामध्ये आरोग्यसेवा खर्चावर आणि प्रवेश योग्यतेवर अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याची क्षमता आहे असे सांगितले. कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख वक्ते प्रा संतोषकुमार एस के, डॉ. राहुल पंडित, डॉ. धीरज कारला, प्रो. शिरीन पिंजारी, प्रो. निलेश वाणी, डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. यावेळी त्यांच्यासोबत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर इ मान्यवर उपस्थीत होते. या एक दिवसीय कार्यशाळेत विविध सत्रात मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी आगामी काळात ए आय तंत्रज्ञान आरोग्य सेवेत महत्वाची भुमीका बजावणार असून प्रवेश योग्यतेवर महत्वपुर्ण प्रभाव पाडण्याची शक्यता आहे.
![GC News2 GC News2](https://jalgaonlive.news/wp-content/uploads/2024/05/GC-News2-1024x576.webp)
पहिल्या सत्रात डॉ राहूल पंडीत व संतोषकुमार एस के यांनी मार्गदर्शन करतांना ए आय तंत्रज्ञान शक्तीवर चालणारी साधने आणि प्रणाली नियमित कार्ये स्वयंचलित करू शकतात, प्रशासकीय प्रक्रिया सुव्यवस्थित करू शकतात आणि संसाधन वाटप ऑप्टिमाइझ करू शकतात, ज्यामुळे आरोग्य सेवा वितरणामध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. एकूणच कार्यक्षमता सुधारून खर्च कमी करू शकतात. तर दुस—या सत्रात औषधोपचार ऑप्टिमायझेशन,हेल्थकेअर रिसोर्स ऍलोकेशन आरोग्य व्यवस्थापन एआय तंत्रज्ञानामध्ये डेटा गोपनीयता चिंता, नियामक आवश्यकता आणि तंत्रज्ञानाच्या प्रवेशातील असमानता यासारख्या संभाव्य आव्हाने आणि दत्तक घेण्यातील अडथळे दूर करणे आवश्यक आहे.
याव्यतिरिक्त, हेल्थकेअरमध्ये एआय चे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी आणि हे तंत्रज्ञान जबाबदार, नैतिक आणि न्याय्य रीतीने उपयोजित केले जातील याची खात्री करण्यासाठी चालू संशोधन, सहयोग आणि नवकल्पना आवश्यक आहेत. असे सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. समृध्दी चव्हाण प्रा. चिन्मया चौधरी व आभार प्रा. निम्मी वर्गीस यांनी मानले तर यशस्वीतेसाठी प्रा.अश्वीनी वैदय, प्रा. जेसनित ढाया, प्रा. मनोरमा कश्यप,प्रा. मिनाव देवी, प्रा. अश्वीनी मानकर, प्रा. पियुष वाघ व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले