⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | ये अंदर की बात हैं, पाटील-महाजन साथ है!

ये अंदर की बात हैं, पाटील-महाजन साथ है!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंत्री गुलाबराव पाटील पोहचले आ.गिरीश महाजनांच्या घरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagarpalika) निकालावरून भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगत असताना जिल्ह्याचे दोन्ही नेते एकाच गाडीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. बुधवारी जामनेरमध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उदघाटनाचा कार्यक्रम आटपून आ.गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) गेले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. जिल्ह्यात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज्यात बोदवड नगरपंचायत निवडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा रंगली. बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे, ऍड.रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर, एकनाथराव खडसे यांच्या गटाची सत्ता थोडक्यात हुकली होती. नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअगोदर जळगावचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा जळगावच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चा रंगल्या आहेत. जळगाव जामनेरात शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केली आहे.

आ.गिरीश महाजन हे विविध मुद्यावर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी काही कार्यकर्ते महाजन यांच्या घरी पोहोचले होते. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधातील आंदोलनात गुलाबराव पाटील यांना बोलवायचं का? असा सवाल गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केला. गिरीश महाजन यांनी हा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

एकनाथराव खडसेंवर पुन्हा टीका

बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथराव खडसे यांना काही म्हणायचे ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथराव खडसे पडले खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये ते हरले. आता कारण कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची, असा प्रकार खडसे यांचा सुरू असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.