⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वीजबिलाच्या कटकटीतून मुक्तता, जिल्ह्यातील २६७४ ‎शेतकऱ्यांना ‎दिवसा वीजपुरवठा‎

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । मुख्यमंत्री सौर कृषिपंप‎ योजनेंतर्गत जिल्ह्यातील २६७४ ‎ शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषिपंपाद्वारे ‎दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतील शेतकरी वीजबिलाच्या कटकटीतून ‎मुक्त झाले आहे.यासह कृषी‎ पंपाचा खर्चही शून्य असल्याने‎ शेतकऱ्यांचा याकडे कल वाढला‎ आहे.‎या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील‎ २६७४ शेतकऱ्यांकडे तीन,पाच व‎ ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषीपंप‎ कार्यान्वित करण्यात आले आहेत.‎त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा‎ विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध‎ झाला आहे.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची‎ वीजजोडणी न झालेले व‎ महावितरणकडे वीज जोडणीसाठी‎ पैसे भरून प्रलंबित असलेल्या‎ कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा‎ वीजपुरवठा उपलब्ध करून‎ देण्यासाठी पारेषणविरहित नवीन‎ वीजजोडण्या देण्यात येत आहे.‎ तसेच अतिदुर्गम व आदिवासी‎ भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य‎ देण्यात येत आहे. त्यासाठी सौर‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎कृषिपंपाच्या आधारभूत किमतीपैकी‎ सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर‎ अनुसूचित जाती, जमाती गटातील‎ शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी‎ हिस्सा आहे. या योजनेंतर्गत एक‎ लाख सौर कृषिपंप देण्याचे उद्दिष्ट‎ पूर्ण होत आले असल्याची‎ माहितीही महावितरणच्या सूत्रांनी‎ दिली. आस्थापित करण्यात‎ आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्षे‎ व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी‎ ‎कालावधी आहे. त्यामुळे‎ शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च‎ देखील शून्य आहे.‎अडचणींवर पर्याय‎ कृषिपंप ग्राहकांना पारंपरिक पद्धतीने‎ विद्युत रोहित्र उभारून लघुदाब‎ वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात‎ येतो; मात्र लघुदाब वाहिनीची लांबी‎ वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा,‎वारंवार बिघाड होतो. मात्र सौर‎ पंपामुळे ही समस्या सुटली आहे.‎

यांना दाखवला जाताे सौरपंपाचा मार्ग‎

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक‎ पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध नाही. विद्युतीकरणासाठी वन विभागाचे‎ ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. अतिदुर्गम भागातील व शासनाच्या धडक‎ सिंचन योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सौरपंपाचा मार्ग दाखवला जात‎ असल्याचेही महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.