---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातेय : एकनाथराव खडसे

eknath khadase
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. भाजपने सुरवातीपासूनच ओबीसी नेत्यांना न्याय दिला आहे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांच्या काळात भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात केलं जात असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केलाय.

eknath khadase

माझ्यावरील आरोप, चौकशी आणि आता ‘ईडी’ (ED) चौकशी ही त्यांचेच षडयंत्र असल्याचा आरोपही खडसेंनी केला.

---Advertisement---

भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत छळ केला असून सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, असा आरोपही खडसे यांनी केलाय.

सध्या राज्याचीच नव्हे तर देशातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे अशावेळी राजकारण करणे योग्य नाही, असे खुद्द नितीन गडकरींनी सांगितले. त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कोरोना पूर्णपणे हद्दपार करेपर्यंत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे मत आपण महिनाभरापूर्वीच मांडल्याचे खडसेंनी सांगितले.

अशा चौकशांना मीदेखील घाबरत नाही

माझ्यावरील आरोप, चौकशीबाबत मी विधिमंडळात अखेरपर्यंत उत्तर मागितले, मात्र ते मिळाले नाही. ‘ईडी’ (ED)व सीबीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. परंतु, अशा चौकशांना भुजबळ अथवा मीदेखील घाबरत नाही, असे खडसे म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---