जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील सावखेडा ब्रू ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून 2015 ते 20 या सालात शासनाकडून आलेल्या निधीत संबंधित तत्कालीन सदस्यांनी गावात विकास कामे झाल्याचा कागदोपत्री बनाव केला आहे. प्रत्यक्षात जागेवर जाऊन तपासणी केली असता निकृष्ट दर्जाचे रस्ते तसेच स्वच्छता गृहे, घरकुल बांधण्यात आले आहे. तसेच 14 व्या वित्त आयोगात निधीची देखील अफरातफर झाल्याचे गावाच्या झालेल्या आजच्या अवस्थेवरून लक्षात येते, असे ग्रामपंचायत सदस्य मंगेश यशवंत पानपाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्याकडे तक्रार केली आहे.

निवेदनात पुढे त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन सदस्यांनी निधीचा सदुउपयोग गावाच्या विकासासाठी प्रामाणिक पणे केला असता तर गावातील विकासाला चालना मिळाली असती. मात्र सदर ठिकाणी अधिकाराचा दुर उपयोग झालेला दिसून येत आहे.
ई- ग्रामस्वराज या शासनाच्या गुगल ऍप्स वर कामे तपासली असता गरज नसताना निधीचा दुरुपयोग केल्याचे समजते आहे. गावात विकासासाठी ज्या ठिकाणी निधी वापरला गेला पाहिजे नेमकं निधी खर्च करताना मोठे राजकारण तसेच अपहार झाल्याचे आढळते रमाई घरकुल योजना तसेच शबरी घरकुल योजना यामध्ये शासनाकडून आलेल्या निधी चा देखील दुरुपयोग झालेला आहे प्रत्यक्षात घरकुलांची अवस्था अतिशय खालावलेल्या व निकृष्ट दर्जाची आहे मात्र सत्य पुढे शहाणपण कोण करणार ? म्हणून तत्कालीन सदस्यांच्या दबावामुळे कोणीही अद्याप पर्यंत तक्रार केलेली नाही, तत्कालीन सदस्यांनी परस्पर हितजोपासून गोरगरीब जनतेला लुटले आहे कृपया करून या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच दोषी असणाऱ्या प्रत्येक तत्कालीन सदस्यांवर शासकीय कलम कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.