⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

SBI ग्राहकांनो लक्ष द्या ! आता ‘या’ नंबरशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत, जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी वेगवेगळे पाऊले उचलली जात आहे. अशातच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकेने देखील ग्राहकांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला. बँकेने आता एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक विशेष क्रमांक द्यावा लागेल. जर तुम्ही हा नंबर टाकला नाही तर तुमची रोकड अडकेल. खरंतर एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. या नियमाबद्दल जाणून घेऊया.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमानुसार ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकत नाहीत. यामध्ये, पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट केल्यानंतरच एटीएममधून पैसे काढले जातात.

बँकेने माहिती दिली आहे
बँकेने या नियमाची माहिती आधीच दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, “एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख काढण्याची प्रणाली ही फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे ही आमची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. SBI ग्राहकांनी OTP आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल याची जाणीव ठेवली पाहिजे.

नियम काय आहे माहित आहे?
ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यावर नवीन नियम लागू केला आहे. या अंतर्गत एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि डेबिट कार्ड पिनवर पाठवलेल्या ओटीपीसह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
यासाठी तुम्हाला एक ओटीपी लागेल, त्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
हा OTP चार अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी मिळेल.
तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला एटीएम स्क्रीनवर ओटीपी प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
रोख पैसे काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.

बँकेने हे पाऊल का उचलले?
OTP आधारित रोख पैसे काढण्याची गरज का आहे? बँकेच्या प्रश्नावर म्हणाले, ‘ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.’ वास्तविक, SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात 71,705 बीसी आउटलेटसह 22,224 शाखा आणि 63,906 ATM/CDM चे सर्वात मोठे नेटवर्क आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 91 दशलक्ष आणि 20 दशलक्ष आहे.