⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीपर्यंत धावणार ; पण मार्गात झाला ‘हा’ बदल…

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीपर्यंत धावणार ; पण मार्गात झाला ‘हा’ बदल…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । गेल्या काही महिन्यांपासून भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (Bhusawal-Pune Hutatma Express) गाडी ही इगतपुरीपर्यंत रेल्वे लाईनच्या कामामुळे धावत होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी पाहता हुतात्मा एक्स्प्रेस ही अमरावतीपर्यंत नेण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. ही गाडी आता पुणे- अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस म्हणून असणार आहे.

प्रवाशांना भुसावळमार्गे पुणे येथे जाण्यासाठी रेल्वेगाड्या कमी आहेत. पुणे-भुसावळ पनवेलमार्गे धावणारी हुतात्मा एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता. परंतु ही गाडी अनेकदा रेल्वे तांत्रिक कामामुळे बंद अथवा ठराविक मार्गापर्यंत धावत होती. मध्य रेल्वेने आता या गाडीचा शेवटचा थांबा भुसावळऐवजी अमरावती केला आहे.

मात्र ही गाडी आता नाशिक कल्याण पनवेल मार्गे न धावता आता अहमदनगर, दौंड मार्गे धावणार आहे. यामुळे काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. खान्देशातुन नाशिक -कल्याण -पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शैक्षणिक, व्यावसायिक कारणासाठी भुसावळ जळगावसह परिसरातून प्रवास करणारे अनेक जण आहेत. मात्र अनेक महिन्यांपासून भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस बंद आहे. ती इगतपुरीपर्यंत धावत आहे. आधी या गाडीला रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद होता.

मात्र आता गाडी क्रमांक 11025/11026 पुणे – भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस आता पुणे – अमरावती पुणे असा विस्तार रेल्वे बोर्डाकडून मंजूर झाला. ही गाडी दौंड मार्गे वळवली असून ती आता पनवेल, कल्याण, नाशिक रोडमार्गे न धावता आता दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरामार्गे अमरावती अशी धावणार आहे.

बडनेरा नाशिक रोड फेस्टिवल स्पेशल मेमू आता दररोज धावणार…
दरम्यान, भुसावळ विभागाच्या वतीने फेस्टीवल स्पेशल म्हणून 6 नोव्हेंबर 2023 ते 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत मेमू ट्रेन सुरु करण्यात येणार अ सून ही ट्रेन आता दररोज धावणार आहे. ही ट्रेन बडनेरा येथून सकाळी 11.05 वाजता निघणार असून मुर्तीजापुर, अकाेला,शेगांव,नांदुरा, मलकापुर, भुसावळ, जळगांव, पाचोरा, चाळीसगांव, नांदगांव मनमाड मार्गे सायंकाळी 7.40 वाजता नाशिक रोड येथे पाेहचणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.