⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत करण्याची खा.उन्मेश पाटलांची केंद्राकडे मागणी

रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत करण्याची खा.उन्मेश पाटलांची केंद्राकडे मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  सद्यस्थितीत रासायनिक खतांच्या किमती बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसताना दुसरीकडे रासायनिक खतांची किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या अनुषंगाने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रासायनिक खतांच्या किंमती पूर्ववत ठेवाव्यात. तसेच खतांवर दिली जाणारी सबसिडी वाढवून द्यावी आग्रही मागणी केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रासायनिक खते मंत्री सदानंद गौडा, रासायनिक खते राज्यमंत्री मनसुख मांडविय तसेच केंद्रीय सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्याकडे पत्राद्वारे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक शोषण होणार असून शेतमालाच्या किमती त्याच असताना, दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

गेल्या वर्षी लॉकडाउन मुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने, खत निर्मिती खर्चात वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्याने खतांच्या किमती वाढल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी आपला देश कृषीप्रधान देश असल्याने बळीराजा जगला पाहिजे त्याला सर्वतोपरी मदत केंद्राकडून झाली पाहिजे या भावनेने रासायनिक खतांच्या झालेल्या दरवाढीबाबत केंद्राने फेरविचार करावा व रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत ठेवाव्यात. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

शेतकरी बांधवांनी काळजी करु नये

येत्या आठवड्याभरात खतांच्या किमती कमी होतील अशा हालचाली केंद्राने वेगात सुरू केल्या असुन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती येत्या आठवडाभरात निश्चितच कमी होतील. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, केंद्र सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

बळीराजास दिलासा देणार

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सात्यत्याने मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी तसेच पक्षाच्या पदाधिकारी यांनी केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी. म्हणून गेल्या काही दिवसापासून  संपर्क साधून नाराजीची भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रासायनिक खते मंत्री मा. सदानंदजी गौडा, तसेच  राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्राद्वारे तसेच केंद्रीय सचिव योगेंद्र त्रिपाठी यांना संपर्क साधून रासायनिक खतांच्या किंमती अचानक वाढल्याने शेतकरी वर्गात विशेषत: भाजपच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजी विषयी जाणीव करून दिली. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा खतांच्या दरवाढी बद्द्ल चिंता व्यक्त केली आहे, शेतकरी बांधवांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने खतांच्या किंमतीपूर्वी प्रमाणेच असाव्यात यासाठी त्वरित एक मंत्रिगटाची नियुक्ती करून खतांच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या आठवड्यात  खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जातील आणि शेतकऱ्यांना वाजवी किमतीत रासायनिक खते मिळतील. खरीप हंगामाच्या आधी हा निर्णय घेतला जाणार आहे.

त्यामुळे देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, येत्या आठवड्यापर्यंत खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.