नागरिकांनो लक्ष द्या : तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

जुलै 6, 2023 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | ०६ जुलै २०२३ । पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला तरी जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला नाहीय. यामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस नं झाल्याने प्रकल्प काही आहे. मात्र जिल्ह्यातील हतनूर धरण (Hatnur Dam) क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. यामुळे सकाळी दहा वाजता हतनुर धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येणार आहे.

tapi river jpg webp

हतनूर धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला. यामुळे आज दिनांक 06/07/2023 रोजी , हतनुर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली आहे. यामुळे आज गुरुवारी सकाळी 10.00 वा. हतनुर धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडण्यात येवून 136.00 क्युमेक्स (4803) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात येणार आहे

तरी हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये (Tapi River) जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडी द्वारे सूचना देणे आवश्यक आहे. हे आपले माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात येत आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now