गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार : पश्चिम रेल्वेकडून ६० विशेष गाड्या

जुलै 16, 2022 11:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेने ६० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकातून या विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

train 2 jpg webp

गणेशोत्सव जवळ आला की मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांची गावाकडे ओढ घेण्यास सुरुवात होते. परिणामी या काळात रेल्वेसह वाहतुकीच्या इतर साधणांवर प्रचंड ताण येतो. तसंच गर्दीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने ६० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई सेंट्रल ते ठोकुर यादरम्यान ६ फेऱ्या होणार असून २३ आणि २४ ऑगस्टला या फेऱ्यांना सुरुवात होईल. तसंच मुंबई सेंट्रल ते मडगाव या मार्गावर ३४ फेऱ्या होतील. या फेऱ्या देखील २४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

दुसरीकडे, वांद्रे टर्मिनस ते कुडाळ (६ फेऱ्या), उधना ते मडगाव (४ फेऱ्या) आणि अहमदाबाद ते कुडाळ (६ फेऱ्या) आणि विश्वामित्री ते कुडाळ (६ फेऱ्या) या गाड्या असणार आहेत. १८ जुलैपासून या रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. प्रवाशांना या गाड्यांची सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर मिळू शकणार आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या या विशेष रेल्वेगाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून रेल्वेच्या निर्णयाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now