३५ रुपयांसाठी रेल्वेशी ५ वर्षे लढा, २.९८ लाख लोकांना असा झाला फायदा

मे 31, 2022 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । अनेक वेळा अल्प रकमेमुळे होणाऱ्या नुकसानाकडे आपण दुर्लक्ष करतो. मग आपण विचार करतो की अहो सोडा, एवढ्या कमी रकमेसाठी झंझट कशाला? परंतु असे काही लोक आहेत जे आर्थिक नुकसानापेक्षा नियम आणि त्यांच्या अधिकारांचा विचार करतात. अशाच एका व्यक्तीने 35 रुपयांसाठी रेल्वेशी 5 वर्षे लढा दिला आणि शेवटी तो जिंकला.

railway station

राजस्थानमधील कोटा येथे राहणारे अभियंता सुजित स्वामी यांच्या या लढ्याचा आणखी २.९८ लाख लोकांना फायदा झाला आहे. आता या सर्वांना रेल्वे 2.43 कोटी रुपये परत करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला 2 वर्षात 33 रुपये मिळाले, परंतु 2 रुपयांसाठी आणखी 3 वर्षे लढावे लागले.

तिकीट रद्द केल्यावर जीएसटी कापला गेला
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, सुजित स्वामी यांनी IRCTC ने दिलेल्या माहितीच्या अधिकारातील उत्तराचा हवाला दिला आहे की IRCTC ने 2.98 लाख ग्राहकांना परतावा म्हणून 2.43 कोटी रुपये मंजूर केले आहेत. खरं तर स्वामी यांनी 7 एप्रिल 2017 रोजी गोल्डन टेंपल मेलमध्ये कोटा ते दिल्लीचे तिकीट बुक केले होते. तो 2 जुलै रोजी प्रवास करणार होता, परंतु त्याचा प्लॅन बदलला आणि त्याने तिकीट रद्द केले. 1 जुलै 2017 पासून जीएसटीची नवीन प्रणाली लागू करण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांनी तिकीट रद्द केले होते. तिकीट 765 रुपये होते आणि 100 रुपये वजा करून त्याला 665 रुपये परत मिळाले.

2 रुपयांसाठी आणखी 3 वर्षे लढले
सुजित स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, तिकीट रद्दीकरण शुल्क म्हणून 65 रुपये कापले जायला हवे होते, परंतु आयआरसीटीसीने सेवा कर म्हणून 35 रुपये अधिक कापले. यानंतर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली लढण्याचा निर्णय घेतला आणि ५० आरटीआय (माहितीचा अधिकार) दाखल केला. तसेच चार सरकारी विभागांना पत्रेही लिहिली. त्यांच्या आरटीआयला उत्तर देताना आयआरसीटीसीने त्यांचे ३५ रुपये परत केले जातील असे सांगितले होते. 1 मे 2019 रोजी त्याला 33 रुपये परत मिळाले, परंतु 2 रुपयांची कपात पुन्हा झाली. यानंतर त्यांनी पुढील 3 वर्षे 2 रुपये परत मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि रेल्वेकडून 2 रुपये घेण्यातही ते यशस्वी झाले.

त्यांनी सांगितले की, पैसे परत करण्याच्या मागणीबद्दल त्यांनी वारंवार ट्विट केले. त्यांनी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जीएसटी कौन्सिल आणि वित्त मंत्रालय यांनाही टॅग केले. आयआरसीटीसीने त्यांच्या आरटीआयला दिलेल्या उत्तरात आता असे म्हटले आहे की, तिकिट रद्द करण्यावर जीएसटी लागू होण्यापूर्वी सेवा कर कापून घेतलेल्या २.९८ लाख प्रवाशांना ३५-३५ रुपये परत केले जातील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now